आज मराठी वृत्तसेवा
आशिया चषक २०२३ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला १० विकेट्सने पराभूत करत आशिया चषकावर नाव कोरले. भारताने एकूण आठव्यांदा आशिया चषक जिंकला आहे. यापूर्वी भारताने 1984, 1988, 1991, 1995, 2010, 2016 आणि 2018 साली आशिया चषकाचे विजेतेपद जिंकले आहे. भारताने 2018 साली रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच आशिया चषक जिंकला होता. त्यामुळे कर्णधार म्हणून रोहितने दुसऱ्यांदा आशिया चषक जिंकला आहे.या सामन्यात श्रीलंकने भारतासमोर विजयासाठी 51 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 6.1 षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केला. भारताकडून सलामीला आलेले इशान किशन 23 धावांवर आणि शुभमन गिल 27 धावांवर नाबाद राहिले. या विजयामुळे देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला आहे