Read Time:1 Minute, 6 Second
क्रीडा प्रतिनिधी l आज मराठी
चीन येथे सुरू असलेल्या आशियाई गेम्समध्ये भारताने इतिहास रचला आशियाई गेम्सचा रविवारी समारोप झाला. यानंतर पदकतालिकेवर नजर टाकल्यास भारत 107 पदकांसह चौथ्या स्थानावर आहे. 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्यपदक भारताने जिंकले. भारताची ही आशियाई गेम्सच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी आहे. तर चीन 201 सुवर्ण, 111 रौप्य आणि 71 कांस्यपदकांसह अव्वलस्थानावर कायम आहे. जपान 52 सुवर्णपदक जिंकून दुसऱ्या स्थानी आहे. तर दक्षिण कोरियाने 42 सुवर्णपदकांसह तिसरे स्थान मिळवले आहे. यात बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मांडवा येथील अविनाश साबळे सहयोगाने भारताला दोन मेडल मिळून दिले आहेत